पुणे : चार दिवसापुर्वीच काँग्रेस पक्षाने माझी उमेदवारी माघारी घ्यावी असे मी जाहीर केले होते. काँग्रेसमधील निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी ही काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे मी आधीच माघार घेतली. परंतु, केंद्रातील भाजप सरकार काँग्रेस मुक्त भारतचा प्रचार करत आहे. अशाकाळात देश चालविण्यासाठी विरोधी पक्षाचीही भूमिका तेवढीच महत्त्वाची असते. भारताची लोकशाही टिकून राहण्यासाठी विरोधीपक्षही तेवढाच प्रबळ असण्याची गरज असणाऱ्यांमधील मी एक आहे. अशी भूमिका काँग्रेस मध्ये नुकताच प्रवेश केलेले संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केली.