मंगळवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD), महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी भागात 25 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.राज्यातील इतर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी आधीच मुसळधार ते अति मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.