Raj Thackeray On Uddhav Thackeray : एकत्र येणं, राहणं कठीण नाही, राज ठाकरेंचं मोठं विधान
ठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत.. महाराष्ट्र खुप मोठा आहे.. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत.. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र रहाणं यात काही मला कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही परंतू विषय फक्त इच्छेचा आहे.. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही.. मला असं वाटतं लार्जर पिच्चर बघणं गरजेचं आहे.. माझं म्हणणं आहे.. सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा..